Wednesday 28 March 2012

हिंदुस्थान हिंदुका नाही किसेका बाप का हे म्हणायच्य आधी विचार करा

 १९३२ -३३ चा काळ होता बनारस हिंदू विद्यालयात एक सभा चालू होती .
पंडित मदन मोहन मालवीय व्याख्यान देत होते ,,,,,
विषय होता "हिदुस्थान हिंदूंचा",,,
मालवीयजी बोलू लागले देशात जे लोक बहुसंख्येने जास्त असतात
ज्या समाजाचे लोक जास्त असतात देश त्या सामाज्याचाच असतो .
आणि येथे हिंदूंची संख्या जास्त असल्या मुळे हा देश हिंदूंचाच आहे .
या पवित्र भूमीचे नाव हि हिंदुंवरून हिंदुस्थान असेच आहे .
आणखी हि बरेच जोरदार दाखले दते त्यांनी हा देश हिंदूंचाच हे सभेला पटवून देत होते .
आणि टाळ्यांचा कडकडात झाला  आणि त्याच कडकडात एक मुलग उठून उभा राहिला
आणि म्हणाला महाराज मी आपल्या मताशी सहमत नाही
२७ वर्षाचा तो तरुण म्हणजे गोवळकर गुरुजी होते ते,,,,,,,,,,
पंडितजींनी विचारले ते कस काय? तू का सहमत नाही?
हिन्दुस्थान हिंदूंचा या सिद्धांताला तुमचा विरोध आहे का?
तेव्हा गुरुजी म्हणाले सिद्धांताला विरोध असण्याच  कारणच नाही
मी स्वतः हिंदू राष्ट्रवादी आहे ,या देशात हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे .
हिन्दुस्थान हिंदूंचाच हे माझेही ठाम मत आहे .
पण हिंदू बहुसंख्य म्हणून हिदुस्थान हिंदूंचा हे मान्य नाही .
बहुसंख्य हिंदूंना अल्पसंख्य करण्याचे करण्याचे डाव सर्व राष्ट्र द्रोही
शक्तीन कडून येथे चालू आहे त्यांना व्यवस्थित आळा नाही घातला तर ,,
देशाच्या काही भागात ,,,,,,
हिंदू समाज आज अल्पसंख्य झाला आहे तसा तो संपूर्ण देशात होणार नाही
याची खात्री आपण नाही देवू शकत आणि अशा तर्हेने संपूर्ण देशाला हि लागण
लागली तर ,,,हिंदू अल्पसंख्य व्हायला कितीसा वेळ लागणार?
मग आपला जो युक्तिवाद आहे बहुसंख्य हिंदूंचा तो हिंदुस्थान
ते कस काय शक्य होईल,,,,,? म्हणून आपल्या या
युक्तिवादाला माझा विरोध आहे.
या देशात चालू असलेल्या सार्वत्रिक धर्मांतरामुळे
आणि हिंदूंच्या निष्क्रियतेमुळे निदान आज तरी मला हे शक्य दिसत नाही .
आणि सभेत पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडात झाला ,,,,,,
आज हे सार आठवायचं कारण,,,,,,,,
परवा एके ठिकाणी वाचाल आसामची परिस्थती पुन्हा बिघडत चालली आहे .
आसाममध्ये बांगला देशी घुसखोरांनी उच्छाद मांडला आहे .
जाळपोळ करून ८० हजार लोकांना विस्थापित केले ,,,
ईतके मोठे अग्नीकांड  देशाच्या एका सीमावर्ती भागात झाले.
आणि सरकार थंडपणे पाहत राहते?
येथे महाराष्ट्रात एखादी बस जरी जाळली तरी त्यच चर्चा होते,,
लगेच देशभरातून उलटसुलट प्रतिक्रियांचा पाऊस पडतो......
 जो खेळ काश्मीर बाबत खेळला गेला तोच खेळ आसाम मध्ये सुरु झाला आहे .
स्थानिक भारतीयांना विस्थापित करून आसाम बळकावण्याचा
प्रयत्न सुरु आहे. बर हे झाल दूर आसामच
येथे मुंबईत भेंडी बझार नावच सावता सुभा आहेच
बांद्रा माहीम शिवडी तिकडे मालेगाव औरंगाबाद 
आणि अशी बरीच ठिकाण आहेत जिथे पोलीस प्रशासन हतबल ठरत
हिंदुस्थान हिंदूंचा असूनही,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
तात्पर्य- भारतात असे जागो जागी असे पाकीस्थान असतील
तर हिंदुस्थान कसा काय शिल्लक राहील?
जे गोवळकर गुरुजींच्या लक्षात आल ते आपण कधी ध्यानात घेणार?
गर्वसे कहो हम हिंदू ही म्हणायच्य आधी विचार करा
हिंदुस्थान हिंदुका नाही किसेका बाप का हे म्हणायच्य आधी विचार करा 

Sunday 15 January 2012

“तिळ गुळ घ्या गोड बोला”

 
मकर संक्रांत हा पौष महिन्यातील महत्त्वाचा सण, दरवर्षी १४ किंवा १५ जानेवारीला संक्रात येतो. (यंदा १५ जानेवारीला आहे)

फार वर्षापुर्वी संकारसुर नावाचा एक राक्षस होता. तो लोकांना फार पीडा देई. त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले. या संक्रांतीदेवीने संकरासुराला ठार केले आणि लोकांना सुखी केले. या दिवशी सुर्य मकर राशित प्रवेशा करतो, त्या दिवशी उत्तरायणाला प्रारंभ होतो. महिला व नववधू ज्या स...णाची आवर्जून वाट पाहत असतात तो सण म्हणजे मकरसंक्रांत सूर्याला मकर संक्रमणावर आधारलेला एक हिंदुस्थानी सण वर्षभरात बारा राशीतुन सूर्याची चारा संक्रमणे होत असली तरी हिंदुस्थानवासियांच्या दृष्टीने मकरसंक्रमणाला म्हणजे संक्रांतीला अधिक महत्त्व आहे. कारण या संक्रमणापासुन सूर्याला उत्तरायणाला प्रारंभ होतो आणि उत्तर गोलार्धात राहणाऱ्या हिंदुस्थानवासीयांना उत्तरायणामध्ये अधिक प्रकाश व उष्णता याचा लाभ होतो....

हिंदुस्थानात बहुतेक भागात हा सण साजरा केला जातो. दक्षिणेत याचवेळी पोंगळ (पोंगल) नावाचा तीन दिवस चालणारा उत्सव आहे. महाराष्ट्रात संक्रांतीच्या आधीच्या दिवशी भोगी असते आणि दुसऱ्या दिवशी किंक्रांत असते. स्त्रिया मृत्तिक घटाचे दान देतात व देवाला तीळ, तांदूळ अर्पण करतात आणि संक्रांतीनिमित्त सौभाग्यपण लुटतात.

संक्रांतीला तिळाचे फार महत्त्व आहे. हा काळ थंडीचा असतो. त्यामुळे अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी तीळ खायचे तसेच बाजरीची भाकरी, लोणी, मुगाच्या डाळीची खिचडी, वांगी, सोताणे, वावटे, गाजर अशा इतर शक्तिवर्धक पदार्थाचा वापर जेवणात करायचा. तीळ वापरण्यातला दुसरा अर्थ सिग्धता. स्निग्धता म्हणजे स्नेह-मैत्री या स्नेहाचे गुळाशी मिश्रण करतात. स्नेहाची गोडी वाढावी हा त्यातला हेतु तेव्हा या दिवशी या तिळगुळाची देवाण घेवाण करायची स्नेह वाढवायचा, नवीन स्नेहसंबंध जोडायचे. जुने असलेले समृद्ध करायचे, तुटलेले आवर्जून पूर्ववत करायचे. खरचं!

“तिळ गुळ घ्या गोड बोला”
या शब्दात केवळ अर्थ भरला आहे.

सर्व मित्र-मैत्रिणींना मकर संक्रांतीच्या हार्दीक सुभेच्छा....